बीड शहर

बीडमध्ये सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान; २२ जणांना पकडले

 शिवाजी नगर ठाण्यातील सपोनि.सलीम पठाण, पोउपनि.रामा औटे

व त्यांच्या सहकार्‍यांनी विविध ठिकाणी कारवाई केली. 

 

अवकाळी पावसासोबत धनंजय मुंडेेही सरकारवर बरसले

कुर्डूवाडी, (प्रतिनिधी):- धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी काल जोरदार पावसात सरकारला चांगले धो धो धुतले. धनंजय मुंडे म्हणाले, कुर्डूवाडीची हल्लाबोल सभा जशी अवकाळी पावसात होत आहे, तसेच राज्यात आणि देशात भाजपचे अवकाळी सरकार सत्तेवर आले आहे. अवकाळी पाऊस असो की अवकाळी आलेले सरकार दोन्हीही नुकसान करणारे असल्यानेच हे अवकाळी सरकार बदलण्याचा निर्धार करूया. असे मुंडे म्हणाले.

बीड जिल्ह्यात अर्ध्या रात्री तुफान आलंया

बीड, (प्रतिनिधी):- पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते’ वाटरकप स्पर्धेस आजपासुन सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शेकडो गावे स्पर्धेमध्ये सहभागी झाले असुन मध्यरात्री १२ वाजता अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. ७८ गावांनी रात्रीपासुनच हातात खोरे, टिकाव आणि टोपलं घेत काम सुरु केले. हातात मशाली घेऊन पुढे आलेले तरुण आणि ग्रामस्थ पाहता अर्ध्या रात्री खरच ‘तुफान आलंया’ ची प्रचिती अनेक गावांनी अनुभवली.

सुख दुःखात साथ देणार्‍या जनतेच्या मनातील प्रश्न सोडवण्यासाठी सतर्क-आ.जयदत्त क्षीरसागर

बीड, (प्रतिनिधी):- इतर शहरामध्ये विकास कामासाठी विरोधकही एकत्र येतात. मात्र, येथील विरोधकांची भूमिका वेगळी आहे. हातात हात घालून विकास कामांना गती देणे दूरच किमान अडथळा तरी निर्माण करू नये ,सुख दुःखात साथ देणार्‍या जनतेच्या मनातील प्रश्न सोडवण्यासाठी सतर्क राहू ,चिंता करू नका यापुढे दर्जेदार कामे करून दाखवू असे प्रतिपादन आ. जयदत्त क्षीसागर केले

पांगरीजवळ भीषण अपघात ; चार ठार एक गंभीर

परळी : तालुक्यातील पांगरी जवळ अ‍ॅपेरिक्षा आणि ट्रव्हल्सच्या समोरासमोरील भीषण अपघातामध्ये ४ युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे. गुरूवारी मध्यरात्री हा अपघात झाला असून जखमी युवकाला उपचारासाठी लातूरकडे हलिवण्यात आले आहे. खासगी ट्रॅव्हल ही नांदेडहून पुण्याकडे निघाली होती तर अ‍ॅपेरिक्षा प्रवाशांना घेऊन पांगरीहून परळीकडे माार्गस्थ होत असताना पांगरी कॅम्पजवळील जुना राजपूत ढाबा येथे ही दुर्घटना घडली आहे.

सधन कुटूंबातील सदस्याला अनुकंपा तत्वावर नियुक्ती नाकारली

बीड, (प्रतिनिधी): आर्थिक सुबत्तेच्या कारणाने हायकोर्टाने अनुकंपा तत्वावर याचिकाकर्तीला नियुक्ती देण्यास नकार दिला. तांत्रिकदृष्ट्या याचिकाकर्ती अनुकंपा तत्वावर नियुक्तीस पात्र आहे. त्यांच्या वडिलांचा शासकीय सेवेत असताना मृत्यू झाला. मुदतीत त्यांनी अर्जही दाखल केला. पण संस्थेने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कर्मचार्‍याच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची नसल्याचे दिसून येते, असे मत याचिका फेटाळताना न्या. एस.व्ही. गंगापूरवाला व न्या. ए. एम. ढवळे यांच्या खंडपीठाने मांडले.

जनतेच्या पदरात विकासाचे माप टाकणे हे मी कर्तव्य समजतो -आ.जयदत्त क्षीरसागर

बीड दि.०५(प्रतिनिधी)ः- शहरासाठी दिर्घकालीन दिखाउ नव्हे तर टिकाउ योजना खेचून आणने आणि त्या प्रत्यक्षपणे राबवणे ही सोपी गोष्ट नाही.

आघाडीमुळे दर्जेदार विकास कामे -पटेल

बीड, (प्रतिनिधी): कुठल्याही कामाचे श्रेय घेण्यासाठी आणी प्रसिद्धी साठी हपापलेल्या बीडच्या फेकू नगराध्यक्षानी आयत्या पिठावर रेगोट्या मारू नयेत ,जनाची नाही मनाची तरी बाळगावी .जिल्हा रुग्णालयात ते बशीरगंज भाजी मंडई ते सुभाष रोड आणा भाऊ साठे चौक ते बिंदुसरा नदी पर्येंत रस्ता नालीचे काम काकु नाना विकास आघाडी मुळेच मार्गी लागले .पंचवीस वर्षात कधी झाला नाही असे दर्जेदार  विकास कामे आघाडीने करून घेतली.दिलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत सदरील कामे होत असताना स्थानिक 

आ. विनायक मेटे यांची जिल्हाधिकार्या समवेत बैठक

अल्पसंख्याक मुलींच्या वसतीगृहाचा प्रश्‍न मार्गी लागणार
 

मुस्लिम महिलांच्या मेळाव्याची तयारी पुर्ण

जिल्हाभरातून येणार हजारोंच्या संख्येने महिला

पत्रकारांमुळे वाचले हरणाचे प्राण

बीड, (प्रतिनिधी):- मोची पिंपळगाव येथे जखमी अवस्थेत असलेल्या हरणाला आज सकाळी पत्रकार संघामुळे जिवनदान मिळाले आहे. जखमी अवस्थेत असलेले हरण रस्त्यावर पडलेले होते. याची माहिती काही नागरिकांनी वन विभागाला दिली मात्र वन विभागाचे त्या ठिकाणी पोहोचले नाही. याची माहिती पत्रकार अमजद खान यांना मिळाल्यानंतर पत्रकार संघाच्या रुग्णवाहिका घेऊन मोची पिंपळगाव येथे जखमी हरणाला घेऊन वन विभाग येथे अमजद खान हे घेऊन आले.

वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून सायमा पठाण यांची नियुक्ती

बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परिक्षेत उत्तीर्ण होवून कोईमत्तर येथे १८ महिन्यांचे प्रशिक्षण पुर्ण करुन सायमा पठाण यांचीे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांची तडकाफडकी बदली

बीड (प्रतिनिधी):- जिल्हा परिषदच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबईच्या विभागीय सचिवपदी त्यांना पदस्थापना देण्यात आली आहे. दरम्यान शिक्षक बदली प्रकरणात शिक्षणाधिकारी राजनोर यांना ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी नोटीस बजावली होती. दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून आपणास निलंबित का करु नये? असा खुलासाही मागविण्यात आला होता.

शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांची तडकाफडकी बदली

बीड (प्रतिनिधी):- जिल्हा परिषदच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबईच्या विभागीय सचिवपदी त्यांना पदस्थापना देण्यात आली आहे. दरम्यान शिक्षक बदली प्रकरणात शिक्षणाधिकारी राजनोर यांना ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी नोटीस बजावली होती. दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून आपणास निलंबित का करु नये? असा खुलासाही मागविण्यात आला होता.

दृष्टीदाता डॉ.तात्यासाहेब लहानेंचे गौरवोद्गार; शिबीरांमुळे रुग्णांना सृष्टी पाहता येईल-आ.क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी) ः-  आ.जयदत्त क्षीरसागर म्हणजेे बीडच्या रूग्णांची काळजी घेणारा आमदार आहे. असे गौरवोदगार दृष्टीदाता डॉ.तात्यासाहेब लहाने यांनी काढले. या शिबीरासाठी आणि बीडच्या रूग्णांसाठी त्यांनी मला सातत्याने भेटून अखेर हे शिबीर घेतलेच शेवटचा रूग्ण तपासल्याशिवाय मी मुंबईला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.

बीडमधील बशिरगंज चौकात आज मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्यावतीने सभा

बीड, (प्रतिनिधी):- तीन तलाक प्रश्‍नी दि.७ एप्रिल रोजी होणार्‍या मुस्लिम महिला मेळाव्याच्या पार्श्‍वभुमीवर आज दि.५ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्यावतीने कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत बोर्डाचे सदस्य हिंगोली येथील मौलाना मुफ्ती जुनेदुल रहेमान व परभणी येथील मौलाना रफीयोद्दीन अशरफी मार्गदर्शन करणार आहेत.

Pages