बीड, (प्रतिनिधी): अंधश्रध्देच्या खाईत खितपत पडलेल्या दलित- शोषित बांधवांना गुलामीच्या जोखमीतून मुक्त करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती करत समाज बांधवांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून दिले, असे प्रतिपादन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीप्रसंगी माळापुरी, भाळवणी, चौसाळा, कोळगांव, सावरगाव (ता.शिरूर) येथे केले.