औरंगाबाद – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर करेल पण शिवसेनेला सोबतच ठेवील, असे मत व्यक्त केले आहे. औरंगाबाद शहरात काँग्रेसच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. सतत पाठिंबा काढण्याची धमकी शिवसेना देते, पण ही फक्त पोकळ धमकी असल्याचही ते म्हणाले.