बीड, (प्रतिनिधी):- सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसू लागल्याचा आरोप करत क्लासेस, मेस, अभ्यासिकावाले जोमात तर एमपीएसीचे विद्यार्थी कोमात अशा घोषणा देत हजारो सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. सिध्दीविनायक संकुलापासून सुरू झालेल्या मोर्चाने शहर दणाणून गेले.
