नवी दिल्ली : (व्रत्तसेवा) वैवाहिक संबंधात दखल देणाऱ्या खाप पंचायतीला सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त चपराक लगावली आहे. 'जर दोन वयस्क (सज्ञान) व्यक्ती लग्न करत असतील तर त्यात तिसऱ्याने दखल देण्याची अवश्यकता नाही. अगदी कुटुंबातील लोक असो वा समाजातील लोक, कुणीही दोन वयस्कांच्या लग्नात हस्तक्षेप करू शकत नाही,' असा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. दरम्यान, खाप पंचायती संबंधी या याचिकेवर येत्या १६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.