Add new comment
राज्याच्या शहरी भागात 8 वी ते 12 वी तर ग्रामीणमध्ये 5 वी ते 7 वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी

राज्याच्या शहरी भागात 8 वी ते 12 वी तर ग्रामीणमध्ये 5 वी ते 7 वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी
बीड दि.10 ( प्रतिनिधी ) कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेल्या शहरी भागातील इयत्ता ८ ते १२ वी चे वर्ग व ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग सुरू करण्याची बाबही शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने राज्य सरकारने आज दि.10 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढले आहे.त्यात म्हटले आहे की, दिनांक १७ ऑगस्ट , २०२१ पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मुंबई , मुंबई उपनगर , ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे . तसेच दिनांक २ ऑगस्ट , २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानूसार कोल्हापूर , सांगली , सातारा , सोलापूर , पुणे , अहमदनगर , बीड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , रायगड , पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे .त्यामुळे बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
