राज्यात 15 दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार?

राज्यात 15 दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार?

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट.

राज गायकवाड माजलगाव.

राज्यात सुरू असलेल्या राजकीय बदलत्या घडामोडी.आणि पडद्यामागील सुरू असलेले बड्या नेत्यातील गुप्त गु पाहता 15 दिवसात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता दिसून येत आहे. असा गोप्यस्पोट माजलगाव मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी भर पत्रकार परिषदेत व्यक्त करून,नंतर हे माझे वैयक्तिक मत असल्याचे घुमजाव केले आहे.
या विधामुळे महाराष्ट्रातील घडत असलेल्या राजकीय घडामोडींना  दुजोरा मिळत आहे.

सोळंके महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते,बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उमेदवारांची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह,शेतकरी कामगार पक्ष,बहुजन विकास मोर्चा,माकप व मानवी हक्क अभियानद्वारे शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून ही निवडणुकीत उतरणार आहेत.या दरम्यान त्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभे करण्याचा मानस व्यक्त केला. ज्याद्वारे व्यापाऱ्यांना आणि  शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे जाहीर केले.या दरम्यान त्यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या राजकीय घडामोडींवर गौप्यस्फोट व्यक्त केला.यावर बोलताना ते म्हणाले की 2024 ला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यभरात पडद्या मागून हालचाली सुरू केल्या आहेत.माजी गेल्या 15   दिवसापासून मुंबईला चक्कर नाही. परंतु माध्यमातून कानावर येत असलेल्या राजकीय घडामोडी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा संशय जाणवत आहे. दरम्यान यावेळी या विधानावर त्यांनी सारवासारव करत हे माझे वैयक्तिक मत असल्याचे बोलून दाखवले.राष्ट्रवादिचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या गौप्यस्फोट विधानामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.