बीड जिल्ह्यातील हॉटेल , रेस्टॉरंट , टपऱ्या 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्यास पर्वाणगी- जिल्हाधिकारी

 

बीड दि.16 ( प्रतिनिधी )जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट ,बार ,पान टपऱ्या पुर्णतः बंदचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. आज यामध्ये बदल करण्यात आला असून हॉटेल्स , रेस्टॉरंट, बार, पान टपऱ्या 50 टक्के लोकांच्या उपस्थितीत सुरू करण्यास जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज दि.16 मार्च रोजी परवानगी दिली आहे. मंगलकार्यालये, फंक्शन हॉल दि.18 मार्च पासून बंदचे आदेश होते. मात्र आता त्यातही बदल करण्यात आले असून सर्व मंगल कार्यालये , फंक्शन हॉल मध्ये 50 व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर होम आयसोलेशनला देखील सर्व नियमासह परवानगी देण्यात आली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.