भाव मिळेना; पांढरी जवळ काकडी, वांग्याचा सडा!

आष्टी : शेतकर्‍यांनी पिकावलेल्या ङ्गळ भाज्यांना भाव मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी वांगे, काकडी रस्त्यावर टाकून दिले.भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांवर ही वेळ आल्याची प्रतिक्रिया शेतकरी रंगनाथ काकडे यांनी दिली. दरम्यान शेतमालाला कुठेच भाव मिळत नसून केंद्र आणि राज्य सरकार या प्रश्‍नी केवळ बघ्याची भुमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
आष्टी ते बीड रस्त्यावरील पांढरी टोलनाक्याजवळ आज दुपारी काकड्या आणि वांग्याचा सडा पडला होता. बाजार पेठेत योग्य भाव न मिळाल्याने कवडीमोल दराने विक्री करण्याऐवजी ङ्गळभाज्या रस्त्यावर टाकून शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला. आडत मार्केटमध्ये काकडीला आणि वांग्याला ५ रूपयाचा दर मिळत असल्याने संतापलेल्या शेतकर्‍यांनी आपला माल रस्त्यावर टाकला. नेहमी अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. शेतकर्‍यांकडे माल असेल तेंव्हा त्या वस्तुला योग्य भाव मिळत नाही. मोठा खर्च करून आणि राबराब कष्ट करून पिकवलेल्या मालाला भावच मिळत नसेल तर ते कवडीमोल दराने विकण्यापेक्षा रस्त्यावर पडलेले बरे अशी भुमिका शेतकर्‍यांनी घेतल्याचे रघुनाथ काकडे यांनी सांगितले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.