तेलगांव पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा उत्सहात संपन्न

▪आ.देशमूख,माजीराज्यमंत्री सोळंके व मोहन जगताप यांची उपस्थिती.

दिंद्रुड
तेलगांव पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांना उत्कृष्ठ सेवा गौरव पुरस्कार व नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध कवी अरुण पवार यांनी खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू ही कविता सादर करुन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
          यावेळी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.आर.टी. देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी अरुण पवार तर उद्घाटक म्हणून माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके उपस्थित होते. छत्रपती साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन मोहनराव जगताप, अनिल महाजन, अनिल वाघमारे, गोरख धुमाळ, शरद यादव, महादेव बडे,ईश्वर मुंडे,लालासाहेब तिडके विठ्ठलदादा लगड, दीपक लगड, विजयकुमार लगड, शेख चाॅद साहाब,संतोष स्वामी, भाजपा ता. सरचिटणीस अश्विनी फड आदींसह माजलगांव,धारुर व वडवणी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
         तेलगांव पत्रकार संघाने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य असल्याचे आ.देशमुख यांनी म्हटले. तसेच आपले लिखाण कोणाच्याही जीवावर बेतणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी उपस्थित पत्रकारांना केली.
           आजकाल तरुण ऐतखाऊ होत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकत आहेत ही बाब समाजासाठी घातक व विनाशाकडे वाटचाल करणारी असल्याचे सूचक विधान माजी राज्य मंत्री सोळंके यांनी केले. तसेच तरुणांनी पडेल ते काम करुन स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
       पत्रकारांवर हल्ले होतात पण आपलं काही चुकतंय का याचं छातीवर हात ठेवून आत्मपरीक्षण करावे अशी अपेक्षा मोहनराव जगताप यांनी व्यक्त केली.पत्रकारांच्या नादी लागणं अवघड आहे म्हणुन सर्वजण कार्यक्रमास हजर राहिले अशी कोपरखळी त्यांनी मारत पत्रकारांनी सत्यता व वस्तुस्थितीचे भान ठेऊन लिखाण करावे अशी सूचनाही जगताप यांनी केली.
        मान्यवरांच्या हस्ते नागनाथ सोनटक्के, सुभाष वाव्हळ, इंजि.एस.एम.चव्हाण, डॉ.यु.के. मेश्राम, गोविंद रामदासी, त्रिंबक बादाडे, अर्जुन मुंडे, लक्ष्मण मोरे, शिवशंकर राऊत, अनिता आंधळे, आशा थोरात,राजेद्र राऊत यांना उत्कृष्ठ सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.यावेळी तेलगाव जि.प ,जिजामाता शाळेचे विद्यार्थी तसेच तेलगाव व परीसरातील सरंपच ,नागरीक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेलगाव पञकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुर्यकांत बडे,सचिव सचिन लगड, बालाप्रसाद जाजू, हनुमान बडे,  सोमेश्वर सोनटक्के, समाधान बडे, बाळासाहेब सोनटक्के यांनी परिश्रम घेतले. आपल्या खाष शैलीतुन बहारदार सूत्रसंचालन उद्धव तोंडे यांनी केले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.