​खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे हल्लाबोल मोर्चा !​ ​​मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - धर्माधिकारी​​

परळी वै.दि. 2/प्रतिनिधी....
नाकर्त्या सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल यात्रा सुरु केली. हल्लाबोल यात्रेचा दुसऱ्या टप्पामराठावाड्यातील सर्व जिल्ह्यात नुकताच संपन्न झाला. याचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरदचंद्र पवार  यांच्या उपस्थितीत शनिवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे होत आले.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.
        शनिवार दि.३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता क्रांतीचौक ते मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात येईल. आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर दुपारी २ वाजता भव्य सभा घेऊन दुसऱ्या टप्प्याची सांगता केली जाईल. मोर्चा व सभेला माजी मंत्री  प्रफुल्ल पटेल , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ पक्षनेते  अजितदादा पवार,  खा. सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्यासह पक्षाचे मराठवाड्यातील सर्व आमदार, सेलप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
   तरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.