Add new comment

मिलिंद एकबोटे यांची जामीन हायकोर्टाने फेटाळली कोणत्याही क्षणी होणार अटक !

मुंबई: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी केलेले अपील मुंबई हायकोर्टाने फेटाळले आहे. शिवाय सुप्रीम कोर्टात अपील करता यावे यासाठी आदेशाला स्थगिती देण्यास किंवा अटक होण्यापासून हंगामी संरक्षण देण्यासही हायकोर्टाचा नकार दिला आहे. यामुळे एकबोटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 

पुणे सेशन्स कोर्टाने २२ जानेवारी रोजी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने एकबोटेंनी त्याविरोधात अपील केले होते. पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल करताना चुकीचे आरोप लावले असल्याचा दावा करत एकबोटे यांनी हा गुन्हाच रद्द करावा अशी मागणी एकबोटे यांनी केली होती. या प्रकरणावर तत्काळ सुनावणी घेण्यासाठी हे प्रकरण नव्या खंडपीठापुढे बुधवारी सादर करण्यात आले. मात्र न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी घेण्यास नकार दिला आणि दुसऱ्या खंडपीठापुढे जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर एकबोटे यांनी दुसऱ्या खंडपीठापुढे आपली याचिका सादर केली. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. यावेळी एकबोटे यांची याचिका खंडपीठाने फेटाळली

१ जानेवारीला कोरेगाव भीमा इथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या आंबेडकरी अनुयायांवर सणसवाडी इथे दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला होता. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरूजी यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. नंतर हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले. 

ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस आपण तिथं नव्हतो, तसेच आपल्या झालेल्या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचा दावा एकबोटे यांनी केला आहे. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.