महाराष्ट्र

पालकमंत्री शिंदेंमुळे जामखेडमध्ये प्रभारीराज; शिवसेनेचा रास्ता रोको

मंत्री शिंदेंच्या त्रासाला कंटाळून अधिकारी तालुक्यात टिकत नाहीत- भोसले
जामखेड, (प्रतिनिधी):- तालुक्याच्या प्रमुख  शासकीय कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी नाहीत या प्रभारीराजला  पालकमंत्रीच जवाबदार आहेत. पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या त्रासाला कंटाळूनच शासकीय अधिकारी तालूक्यात टिकत नाहीत असा घणाघाती आरोप  शिवसेनेचे तालुकाप्रमुख शहाजीराजे भोसले यांनी केला. 

शोपियन, अनंतनागमध्ये एन्काऊंटर, ११ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर, (वृत्तसंस्था):- जम्मू-काश्मीरच्या शोपियन आणि अनंतनागमध्ये तीन चकमकींमध्ये सुरक्षा यंत्रणांनी टॉप कमांडरसह अकरा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये लष्कराचे तीन जवानही जखमी झाले. अगोदर अनंतनागमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला आणि एकाला ताब्यात घेतलं. या दशहतवाद्याची चौकशी सुरु आहे.

शिवसेना कर्नाटक विधानसभेच्या ५० ते ५५ जागा लढवणार

मुंबई, (प्रतिनिधी):- गोवा आणि उत्तर प्रदेश पाठोपाठ शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात घोषणा केली. महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेना पाठिंबा देणार आहे.
कर्नाटकात शिवसेना ५० ते ५५ जागा लढवणार आहे. शिवसेनेने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता.

फडणवीसजी, नोकरभरती केली की यादी द्या- शिवसेना

मुंबई, (प्रतिनिधी):- दोन वर्षांत ७२ हजार सरकारी नोकर्‍या देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘बोलायचे आणि विसरून जायचे. थापा मारून वेळ काढायचा हे तंत्र नव्या सरकारला चांगलेच जमते,’ असं सुनावतानाच, ’पहिल्या वर्षी ३६ हजार जागा भराल, तेव्हा त्या लोकांची यादीही जाहीर करा,’ असं आव्हान उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. 

मंत्रिमंडळ विस्ताराला एप्रिलचा मुहूर्त, मुख्यमंत्र्यांनीच दिली माहिती

मुंबई, (प्रतिनिधी):- राज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आता एप्रिल महिन्याचा मुहूर्त काढण्यात आला आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनीच ही माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पत्रकारांना दिली. त्यामुळे संभाव्य नावांच्या चर्चेबरोबर
कोणाकोणाला डच्चू मिळणार याचेही आडाखे बांधले जात आहेत.
केंद्र व राज्यातील भाजपा प्रणीत सरकार आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीचा हा कदाचित शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असेल. मंत्रिमंडळात या वेळी आणखी तीन मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे

यूपीचं योगी सरकार डॉ. आंबेडकरांच्या नावात ‘रामजी’ जोडणार!

 
लखनौ : उत्तर प्रदेशातील सर्व राजकीय रेकॉर्डमध्ये आता भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या नावात ‘रामजी’ जोडलं जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने ‘डॉ. भीमराव आंबेडकर’ यांचं नाव बदलून ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर’ करण्यासाठी, सर्व विभाग आणि अलाबाहाद-लखनौमधील हायकोर्टाच्या सर्व खंडपीठांना आदेश दिले आहेत.

अण्णा हजारे आज उपोषण सोडण्याची शक्यता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था):- जनलोकपाल आणि शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावत चालली आहे. गुरुवारी अण्णांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार होऊन त्यांचे उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडून सुरु आहे. अण्णांच्या प्रकृतीची चिंता असल्याने कोअर टीमने सरकारशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.

कोपर्डी येथील आरोपींवरील हल्ला प्रकरण गेवराईच्या दोघांसह चौघांना सहा वर्षांची शिक्षा

अहमदनगर, (प्रतिनिधी):-कोपर्डी खटल्याच्या सुनावणीनंतर तीनही आरोपींना जिल्हा न्यायालयातून बाहेर घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आरोपींमध्ये गेवराई तालुक्यातील दोघांचा तर जालना जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. चौघेही शिवबा संघटनेचे कार्यकर्ते आहेत.

कर्नाटकात निवडणुकीचे बिगुल वाजले; १५ मे रोजी फैसला; हात चालणार की कमळ फुलणार?

दिल्ली, (वृत्तसंस्था):-देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांचं अखेर आज बिगूल वाजलं आहे. १२ मे रोजी येथे मतदान होणार असून १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. कर्नाटकमध्ये २२४ जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून आजपासूनच आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही आयोगाने केली आहे. कर्नाटकात सध्या १२२ आमदारांसह कॉंग्रेस सत्तेत आहे.

कॉंग्रेसची मोटबांधणी; विधानसभेच्या जागासंदर्भात मुंबईत बैठक

पुढील आठवड्यात होणार्‍या बैठकीत पदाधिकार्‍यांशी चर्चा; बीडमधून ३ जागांवर दावा

चारा घोटाळा: लालूप्रसाद यादव यांना १४ वर्षांची शिक्षा, ६० लाखांचा दंड

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था):-चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली.

राज्यसभा निवडणूक : जाणून घ्या कोण आणि कुठे जिंकले...

नवी दिल्ली ,व्रतसेवा:  १६ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान झाले.

संपामुळे बालकांचा मृत्यू झाल्यास जबाबदारी विरोधक घेणार का? मेस्मावरून गदारोळ करणार्‍या विरोधकांना ना. पंकजाताई मुंडे यांचा खडा सवाल

मुंबई, (प्रतिनिधी):- कुपोषित बालकांना सकस व नियमित आहार मिळावा तसेच यंत्रणेत सुसूत्रता यावी यासाठी अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायदा लागू करण्यात आला आहे, हा कायदा अन्यायकारक नाही असे स्पष्ट करून संपाच्या काळात एखाद्या बालकांवर मृत्यू ओढवल्यास त्याची जबाबदारी आपण घेणार का? असा संतप्त सवाल करून महिला व बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी  विरोधकांचा हल्ला परतावून लावला.

शिवसेना आमदार चौगुलेंनी विधानसभेतील राजदंड पळवला

मुंबई, (प्रतिनिधी):-अंगणवाडी सेविकांना लावलेला मेस्मा कायदा मागे घेण्याची मागणी सत्तारूढ शिवसेनेसह कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली. विधानसभेत याप्रश्नी गदारोळ सुरू असतानाच अचानक सेनेचे उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सभागृहातील राजदंड पळवला.

सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटला जातोय, अजित पवारांची सरकारवर टीका

मुंबई, (प्रतिनिधी):-अंगणवाडी सेविकांना अत्यावश्यक सेवा कायद्याखाली ‘मेस्मा’ लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी शिवसेनेसह विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार करत असून त्यांची हुकूमशाही प्रवृत्ती सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.

जात प्रमाणात पडताळणी मुदतवाढ विधेयक मंजूर

मुंबई, (प्रतिनिधी):- महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना जात प्रमाणात पडताळणीसाठी सहा महिन्याची मुदतवाढ देणारं  विधेयक, विधानपरिषदेत आज  मंजूर करण्यात आलं. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मांडलेलं हे विधेयक कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर झालं. त्यापूर्वी हे विधेयक काळ विधानसभेने मंजूर केलं होतं .

इराकमध्ये अपहरण केलेल्या ३९ भारतीयांना इसिसने मारले - सुषमा स्वराज

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था):- इराकमध्ये अपहरण झालेल्या ३९ भारतीयंना इसिसने मारल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी आज मंगळवारी राज्यसभेत बोलताना दिली आहे. यामध्ये अनेकजण पंजाब राज्यातील आहेत.  २०१४ मध्ये मोसुलमधून काही भारतीयांचे अपहरण झालं होतं. इसिसने ३९ भारतीयांना मारल्याचे पुरावे मिळाल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले. ३८ लोकांचा डीएनए जुळला आहे तर एकोणचाळीसाव्याचा डीएनए ७० टक्के जुळला आहे. 

Pages