शिरूर

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस मारहान

शिरूर, (प्रतिनिधी):- घराचा दरवाजा उघडण्यास एवढा वेळ लागतोच कसा? असा सवाल उपस्थित करून चारित्र्याच्या संशायावरून पत्नीला मारहान केल्याची घटना तालुक्यातील खोकरमोहा येथे घडली आहे. पतीच्या मारहानीला कंटाळून सुमित्रा महारुद्र नागरगोजे यांनी पती महारुद्र नागरगोजे याच्या विरोधात शिरूर ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. सोमवारी रात्री सुमित्रा यांचे सासु-सासरे हे सप्ताहाच्या निमित्ताने तागडगांव येथे गेले होते.