महाराष्ट्र

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

अहमदनगर : सरकारच्या अर्थसंकल्पावर अनेक मत मतांतरे मांडली जात आहेत. सत्ताधारी समर्थन करत आहेत, तर विरोधक टीका करत आहेत.

स्वबळाचा बाण सुटलाय, आता माघार नाहीच- संजय राऊत

मुंबई (वृत्तसेवा) संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावरही ताशेरे ओढले. जेटलींनी सादर केलेला अर्थसंकल्प फक्त कागदावरच खूप चांगला वाटतोय. सध्या देशभरात शेतकरी आत्महत्या करत आहेत. सध्यातरी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीविषयी इतक्या लवकर निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.

काय स्वस्त, काय महाग?

नवी दिल्ली-(व्रतसेवा)

खादी ग्रामोद्योगाच्या डायरीवर पुन्हा महात्मा गांधींऐवजी मोदींचा फोटो !

गेल्या वर्षी टीकेचं धनी झाल्यानंतर यंदाही भाजप सरकारनं 'पहिले पाढे पंचावन्न'चा कित्ता गिरवलाय. यंदाच्या खादी ग्रामोद्योगाच्या डायरीवरून महात्मा गांधींना गायब केलंय. डायरीच्या पहिल्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच फोटो छापण्यात आलाय. गेल्या वर्षी खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवरून सरकारनं महात्मा गांधींना गायब केलं होतं.

अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अर्थसंकल्‍प  : मुख्‍यमंत्री

मुंबई :
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे, अशा शब्‍दांत मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्‍गार काढले आहेत. ‘सबका साथ-सबका विकास’ व्याख्येचा आणखी विस्तार, नवभारताची निर्मितीकडे वाटचाल आहे, असे फडणवीस यांनी ट्‍विट करत म्‍हटले आहे. 

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्‍या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

​​मंत्रालयातील सरपंच दरबारामुळे ग्रामीण प्रश्नाला मिळाले हक्काचे व्यासपीठ ​​- ​दोनशे सरपंचांनी मांडले विविध प्रश्न​ ​ग्रामविकासाची चळवळ गतिमान करण्याचे ना पंकजाताई मुंडे यांचे आवाहन

​मुंबई, दि. १ ------ मंत्रालयात ग्रामविकास विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या सरपंच दरबारास आज भरीव प्रतिसाद मिळाला. राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या सरपंच दरबारास राज्याच्या सर्व भागातील साधारण २०० सरपंचांनी उपस्थिती लावून त्या त्या भागातील विविध प्रश्न मांडले.

ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरणास चालना देणारा अर्थसंकल्प - ना. पंकजाताई मुंडे

मुंबई, दि. १ : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत सादर केलेला अर्थसंकल्प ग्रामीण विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान करणारा तसेच महिलांच्या आर्थिक, सामाजिक सक्षमीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या विकासदरात येत्या काळात आणखी सुधारणा होईल, अशी प्रतिक्रिया राज्याच्या ग्रामविकास, महिला आणि बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली.

धुळ्यात पोलीस निरीक्षकाची गोळी झाडुन अात्महत्या

धुळे । (प्रतिनिधी) येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे स्था गु शाखेचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक रमेशसिंह परदेशी यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गोळी झाडून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून झाडली गोळी

दिलखुलास कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे  

मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात ‘बीड जिल्ह्याचा विकास’ या विषयावर ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री पंकजा मुंडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
            ही मुलाखत गुरुवार दि. 1 आणि शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका रुपलक्ष्मी चौगुले-शिंदे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आकाशात सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून पाहण्याचा त्रिवेणी संगम

अवकाशातील घटना या मनुष्यासाठी नेहमीच कुतूहलाच्या असतात. आकाशात सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून पाहण्याचा त्रिवेणी संगम आज जुळून आलाय.

पोलिसांना महाराष्ट्रात मनपसंत ठिकाणी बदली

राज्याचा गृहविभाग पोलिस कर्मचार्‍यांच्या सेवाशर्तीमध्ये लवकरच सुधारणा करणार आहे. त्यामुळे पोलिसांना आपल्या पसंतीच्या जिल्ह्यात बदली करुन घेता येणार आहे.

मुंबई : पोलिसांच्या कामाचे तास आणि ताण यामुळे अनेकदा कुटुंबाकडे लक्ष देणं कठीण जातं. त्यातच जर पोलिसांची बदली घरापासून दूर झाली असेल, तर वैयक्तिक आयुष्याचं गणित जमवणं जिकीरीचं होतं. यामुळे राज्याच्या गृहविभागाने पोलिसांना मनपसंतीच्या जिल्ह्यात बदली देण्याचा निर्णय घेतला आहे. 'दैनिक पुढारी' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

पोटच्या ३ वर्षाच्या मुलीसह सासूच्या खुनाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

मुलगी व सासूला रॉकेल टाकून क्रूरपणे जाळून मारले

अस्मानाबाद:-पोटच्या ३ वर्षाच्या मुलीसह सासूचा क्रूरपणे जाळून खून केल्याप्रकरणी मिनाक्षी पांचाळ या महिलेला उस्मानाबाद कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे..

दुहेरी खून प्रकरणी मिनाक्षी पांचाळ या महिला आरोपीला जन्मठेप सुनावली असून आरोपी महिला एस.टी. महामंडळात कंडक्टर म्हणून काम करीत होती.. सर्व महत्वाचे साक्षीदार फितूर झाले असताना सासूचा मृत्यूपूर्व जबाब महत्वाचा ठरला.

कॉ.गोविंद पानसरे हत्याप्रकरण: वीरेंद्र तावडेला न्यायालयाकडून जामीन मंजूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडे याला मंगळवारी न्यायालयाकडून २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. जून २०१६ पासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, पोलिसांना न्यायालयात त्याच्याविरोधात सबळ पुरावे सादर न करता आल्यामुळे अखेर कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. यामुळे पोलिसांच्या तपासाविषयी पुन्हा शंका उपस्थित झाल्या आहेत.

अस्मिता योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता ; प्रचार प्रसिध्दीच्या वार्षिक खर्चास 1 कोटी रुपये ; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

मुंबई, दि.30..राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलींना मिळणार पाच रुपयात सॅनिटरी नॅपकीन तसेच राज्यातील ग्रामीण भागातील महिला व 11-19 वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी राज्यात अस्मिता योजना राबवण्यास आज राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

दुग्धविकासमंञी महादेव जानकर यांची निर्दोश मुक्तता !

गडचिरोली -
देसाईगंज येतील नगर पालिकाच्या निवडणुकीदारम्यांन  निवडणुक निर्णय अधिकार्यावर फोनवरुन चिन्ह देण्याच्या दबाव  प्रकरण..देसाईगंज नगर पालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांना फोनवरून निवडणूक चिन्हा संदर्भात फोनवरून दबाव आणल्याबाबत चा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची  आज   ता ३० ला  देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधिश के आर  सिघेल यांनी सबळ पुरावे अभावी निर्दोश मुक्तता.केली अाहे

कुख्यात गँगस्टर इम्रान मेंहदी आणि कुरेशी समर्थकात कोर्ट आवारातच राडा

औरंगाबाद : कुख्यात गँगस्टर तथा सुपारी किलर इम्रान मेंहदी आणि मृत माजी नगरसेवक सलीम कुरेशी समर्थकांमध्ये आज सायंकाळी जिल्हा कोर्टाच्या आवारात जोरदार हाणामारी झाली. यात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर घाटी रुग्णालयातसुद्धा दोन्ही गट परत एकदा आमने - सामने आल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला. 

​बीडीडी चाळीत ३० वर्षांपासून राहणाऱ्या पोलिसांना म्हाडाची घरे:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​

​मुंबई : बीडीडी चाळीत ३० वर्षापासून राहणाऱ्या पोलीसांना घरे तयार झाल्यावर हस्तांतरित करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाला दिले.​

​भाजपचे मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया:-नवाब मलिक यांचा आरोप​ ; ​रावल यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करुन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा…​

​मुंबई : पर्यटनमंत्री मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया असून, ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने खरेदी करत आहेतच शिवाय त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचीही जमीन बळकावली आहे. रावल यांना धर्मा पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत धरुन त्यांच्यावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा आणि त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी त्याचबरोबर त्यांना मदत करणारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.​

मोनाच्या खुनाच्या आदल्या रात्री नेमके काय घडले ?

उस्मानाबाद - पत्नीच्या खून प्रकरणी अटकेत असलेले येरमाळा पोलीस स्टेशनचे सपोनि विनोद चव्हाण चांगले पोलीस अधिकारी होते, ते असे कृत्य करू शकत नाहीत, असे चित्र एकीकडे रंगवले जात असले तरी, मयत मोनाच्या आई - वडिलांची बाईट ऐकली तर नक्कीच संशयाला जागा आहे आणि माणूस वरून कितीही चांगला वागत असला तरी घरी मात्र तो सैतानासारखा वागतो,असे समोर आले आहे.येरमाळा पोलीस स्टेशनचे सपोनि विनोद चव्हाण हे मूळचे बीड जिल्ह्यातील चौसाळा गावचे.

मंत्रालयात विष प्राशन केलेले धर्मा पाटील यांचे निधन

मुंबई :-संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात हेलपाटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले होते. या ८० वर्षीय धर्मा पाटील यांनी अखेर जे.जे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. योग्य तो मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतक-याचा दर्जा देण्याचे आश्वासन लेखी स्वरुपात मिळत नाही तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्विकारणार नसल्याचे त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Pages