बीड दि.11 ( प्रतिनिधी ) देशातील काही राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्रातही कोंबड्या आणि कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाल्याचे समोर आले आहे.मुंबई, ठाणे, परभणी ,दापोली आणि बीड जिल्ह्यातील कोंबड्या व कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालय , नवी दिल्ली यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे 26 कावळे मृतावस्थेत आढळून आले होते. त्यापैकी तीन कावळ्यांचे मृत अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.