विकासाची प्रक्रिया चालूच राहणार- डॉ.भारतभूषण क्षीरसागर

बीड,(प्रतिनिधी)ः- शहरातील सर्वच रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे होणार आहेत तत्पुर्वी पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आणि नाल्यांची कामे चालू आहेत. ज्या भागात मुलभूत सुविधा पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले त्याची आज पुर्तता करत असताना समाधान होत आहे. एकता नगर वासियांनी अशीच एकी ठेऊन विकास प्रक्रियेसाठी सहकार्य करावे. शहरातील विकासाची ही प्रक्रिया चालूच राहणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.
पालवन चौक भागात नागसेन बुध्द विहाराजवळ असलेल्या कॉलनीचे एकता नगर असे नामकरण करून वचनपुर्ती समारंभ संपन्न झाला. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते हा नामकरण सोहळा नामफलकाचे फित कापून करण्यात आला. यावेळी न.से.गणेश वाघमारे, भिमराव वाघचौरे, ऍड.शेख शफिक, उमाजी वाघमारे, प्रा.व्ही.आर.गाडे, नाना मस्के, प्रा.बागडे, डॉ.मधूकर जाधवर, मधूकर लोंढे, प्रताप मोरे, दादा उजगरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अजय बाबूराव गालफाडे, लखन जोगदंड, शिवाजीराव राठोड, भिमराव बोंबाळे, सावंत सर, जयवंत सरवदे, कपील सोनवणे, गौरव गायकवाड, डोळस, शिवाजी काळे, भारतभूषण जाधव, वाघमारे, प्रताप वाळके, श्रीराम मस्के, सिरसट, पारवे, सचिन आदमाने, समाधान जाधव, प्रमोद शिंदे आदिंसह या भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.