किसान मोर्चासोबत मंत्री गिरीश महाजन चर्चा करणार

मुंबई , (प्रतिनिधी):- मजल-दरमजल करत नाशिकमधून निघालेला शेतकर्‍यांचा भव्य मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. ठाण्यातील मुक्कामानंतर हा मोर्चा उद्या, म्हणजे १२ तारखेला विधीमंडळावर धडकणार आहे. किसान सभेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला.
किसान मोर्चासोबत चर्चेसाठी आता सरकारनं सकारात्मक हालचाली सुरु केल्या आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन विक्रोळीमध्ये मोर्चेकर्‍यांची भेट घेणार असल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे गिरीश महाजन सरकारच्या वतीनं मोर्चेकर्‍यांना काय आश्वासनं देतात, हे पाहणं महत्वाचं आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.