पंकजाताईच्या तिरंगा एकता रॅली ला उस्फुर्त स्वागत

संपूर्ण बीड जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना आज भारतीय जनता पक्ष बीड शहर आयोजित तिरंगा एकता रॅली मध्ये सहभागी झाले. आणि समता आणि बंधुतेचा संदेश देण्यासाठी शहरातील प्रत्येक भागासह जिल्ह्याच्या पूर्ण मतदार संघात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आज सायंकाळी 04 वाजता परळी शहरात देखील या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
 
बीड मतदार संघात मी या रॅलीचे नेतृत्व केले.  व पुढील शब्दात मी भावना व्यक्त केल्या. "  तिरंग्याच्या रक्षणासाठी  हजारो भारतीय  धारातीर्थी पडले.  देश प्रजासत्ताक झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली.  अखंड भारतासाठी  सतत प्रयत्नशील राहू या.  
 
तिरंगा रॅलीला जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सर्जेराव तांदळे, संतोष हंगे, स्वप्नील गलदर, जगदीश गुरकुते, अजय सवाई, विक्रांत हजारी, राजेंद्र बांगर, भगीरथ बियाणी, मुन्ना फड, संध्या राजपूत, संगीता धसे यांच्यासह शहरातील  पदाधिकारी व  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
 
 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.